नाशिक (महाराष्ट्र) येथील सोशल नेटवर्कींग फोरम टीम,ग्रामस्थ, माळेगाव (ता.त्र्यंबक,जि.नाशिक) आणि विद्या निकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेले गेले आहे एक अनोखे काम जे भारतातील सर्व आदिवासी पाड्यावर राबविले जाऊ शकते,लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते ज्यांना खरोखर काम करण्याची इच्छा आहे.

प्रमोदजी सांगू लागतात,त्याचे असे झाले, ‘गेल्या डिसेंबरमध्ये आपल्या गावचा पाणी प्रश्न घेऊन त्र्यंबक तालुक्यातील माळेगाव या गावाचे ग्रामस्थ भेटले. या गावाला ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या सदस्यांनी भेट दिली आणि पाणी प्रश्न हाती घेण्याचे ठरवले. एक ग्रामसभा घेऊन त्यात एकूण कामाची रूपरेषा ठरवण्यात आली. ग्रामस्थांचे श्रमदान, ग्रामपंचायतीची साठवणूक टाकी आणि सोशल नेटवर्किंग फोरमची पाईपलाईन, वीजपंप आणि अन्य कामांसाठी निधी संकलन अशा जबाबदाऱ्या ठरल्या. मार्च महिन्यात कामाला सुरुवात करण्यात आली. सोशल नेटवर्कर्सची भक्कम साथ आणि शासकीय विद्या निकेतन माजी विद्यार्थी परिवाराने उचललेली जबाबदारी यामुळे निधी संकलनाची चिंता मिटली. श्रेयवाद - राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावानेही साथ दिली आणि अवघ्या दिड महिन्यात गावातील टाकीत पाणीही पडले.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर (तळवाडे फाट्यापासून १२ किलोमीटर) ग्रामपंचायत, माळेगाव,( ता त्र्यंबकेश्वर जि. नाशिक) येथे १४ एप्रिल २०१७ रोजी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी या योजनेचे लोकार्पण गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आले आणि अखंड मानवतेच्या प्रेरक शक्ती म्हणून ओळखल्या जाणा-या बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.

एका बाजूला माळेगावच्या महिलांच्या हालअपेष्टा संपणार असल्याचे समाधान तर दुस-या बाजूला हे आश्वासक चित्र.आता पाण्याची कमतरता भासणार नाही.

Path Alias
/articles/saosala-naetavarakainga-phaorama-jalaabhaiyaana-bhaaga-1
Post By: Hindi